Views


*जिल्ह्यातील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा -- भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी महावितरण कार्यालयास दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (महावितरण) यांच्याकडून होत असलेल्या सततच्या कमी दाबाने व अल्पकाळ विद्युत पुरवठा यामुळे जिल्ह्यातील शेतकरी खूप मोठया संकटात सापडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील कांही दिवसापासून पावसाने ओढ दिली असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच महावितरणकडून सततची लोडशेंडीग व कमी दाबाने विद्युत पुरवठा तसेच वीज येणे जाणे अशा असंख्य तक्रारी सर्व सामान्य शेतकरी वर्गास भेडसावत आहेत. त्याचप्रमाणे खराब झालेली रोहित्रे त्वरीत दुरुस्त करुन मिळण्या मध्ये ही सतत अडचण होत आहे. अशा सर्व समस्यांना शेतकरी वर्ग तोंड देत आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असताना व शेतात विहिरीत बोअरवेल, तळ्यात पाणी असताना महावितरणच्या गौरकारभारामुळे पिकास पाणी देता येत नसून शेतकऱ्यांची पिके अडचणीत येत आहेत. त्यांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. तरी तातडीने जिल्ह्यातील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा, अन्यथा भाजपाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी महावितरण कार्यालयात निवेदन दिल्यानंतर अभियंता यांनी योग्य ते सहकार्य करुन वीज पुरवठा पुर्ववत अखंडीत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.खंडेराव चौरे, रामदास कोळगे, प्रदिप शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, नामदेव नायकल, ओम नाईकवाडी, श्रीकांत तेरकर, अशिष नायकल, गणेश मोरे, अभिराम पाटील, स्वप्निल पाटील, अभय इंगळे, नगरसेवक प्रविण पाठक, विजय शिंगाडे, हिमत भोसले, सुनिल पंगुडवाले, यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते





 
Top