Views



*डॉ.विठ्ठलराव जाधव यांच्या कार्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. कोरोना काळात राज्यात शांतीदूत परिवारच्या वतीने रक्तदानाच्या अनेक शिबीराचे आयोजन करण्यात आले. प्लाज्मादानासाठी प्रोत्साहन, रक्तदान करण्यासंबधी जनजागृती करण्यात आली. राज्यातील अनेक ठिकाणी मोठयाप्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. अनेक तालुक्यातील गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतकरी मेळावे घेऊन उच्चस्तरीय प्रयत्न करण्यात आले. त्यांची ही सेवा निरंतर सुरूच आहे. या अनेक लोक उपयुक्त सामाजिक कार्याची दखल घेऊन या कार्याची नोंद लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. रविवारी दि.11 जुलै रोजी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेचे राष्ट्रीय सचिव डॉ. दिपक हरके, राज्य उपाध्यक्ष महेबुब सय्यद, आदम सय्यद, निर्माता दिग्दर्शक सिकंदर सय्यद यांच्या हस्ते डॉ.विठ्ठलराव जाधव यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ.जाधव यांनी हा सन्मान फक्त माझा नसून या कार्यासाठी झटणाऱ्या देशातील अनेक स्वंयसेवक व पदाधिकाऱ्यांचा असल्याचे सांगून यापुढेही असेच नेटाने परिवाराकडून कार्य होईल. या सन्मानामुळे आम्हाला अजून काम करण्याची प्रेरणा मिळेल.
 
Top