Views




*डॉ.विठ्ठलराव जाधव यांची कृषी आयुक्तांशी भेट : शेतकऱ्यांच्या समस्याविषयी केली चर्चा,'शेतकरी - ते- ग्राहक' योजनेत शेतकरऱ्यांना एका छत्राखाली आणुन
कृषी माल संकलन केंद्र उभारणार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त श्री धीरज कुमार यांची मंगळवारी दि. 30 मार्च रोजी पुणे येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी उमरगा व परिसरातील शेतकर्‍यांच्या समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसंबंधी व शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासंबंधी व शेतकऱ्यांसाठी शांतीदुत परिवाराच्या माध्यमातुन उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाविषयी चर्चा करण्यात आली. शांतिदुत परिवार' , "शाश्वत कृषि विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी" व 'कृषि विभाग/कृषि आत्मा' यांच्या मार्गदर्शनाने लवकरच उमरगा व परिसरातील शेतकऱ्यांचे एकत्रित गट तयार करून शंभर एकर क्षेत्रात एकत्रित सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. संपूर्ण विक्री व्यवस्था 'शेतकरी-ते-ग्राहक" या योजनेत करण्यात येणार असुन शेतकऱ्यांसाठी कृषि माल संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उमरगा परिसरात तर दुसऱ्या टप्प्यात लातूर, सोलापूर, उस्मानाबाद शहरात ही योजना राबविण्यात येणार आहे.
 पुणे व हैदराबाद शहरात पावसाळ्यात भाजी चे भाव तेजीत असताना या भागातील शेतकऱ्यांना नफा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दि.27 मार्च रोजी उमरगा येथे घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सातारा व पुणे येथील तज्ञांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेले समस्या डॉ. विठ्ठलराव जाधव व शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक तथा बाजारपेठ संकल्पक विजय ठुबे (पुणे) यांनी आयुक्तांसमोर मांडल्या, त्यावर 
शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शासन स्थरावर सोडविण्यात येणार असुन सदर प्रकल्पास महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्तांनी त्यास अनुमती दिली आहे. दोन दिवसापुर्वीच झालेल्या बैठकीत समोर आलेल्या समस्या कृषी आयुक्तासमोर मांडून उपाययोजना होत असल्याने शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
-----------------------------------------------------------------------
कृषी आयुक्तांना शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण
कोरोनाची परस्थिती निवळल्यानंतर शांतीदुत परिवारच्या वतीने 'उन्नत शेती - समृद्ध शेतकरी' हे ब्रीद घेऊन उमरगा येथे भव्य मराठवाडा विभागीय शेतकरी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी मेळाव्याचे संयोजक राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी राज्याच्या कृषी आयुक्तांना या मिळाव्याचे निमंत्रण दिले असुन या मेळाव्याला आयुक्तांनी येण्याचे मान्य केले आहे.


 
Top