Views


मनसेच्या कार्यकर्त्यांनी विज बिल माफी सह वाढीव बिलाच्या संदर्भात महावितरण कार्यालय फोडले....

कळंब:-( प्रतिनिधी)

सध्या महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना व लॉकडाऊन मुळे जनता त्रस्त आहे त्यातच वाढीव लाईट बिल येणे,अवेळी जाणारी वीज,महावितरण चा न लागणारा फोन अश्या एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.
‘वीज बिल माफ करा’ या मागणीसाठी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार(दि.01) रोजी कळंब शहरातील महावितरण कार्यालयात तुफान राडा केला आहे.यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत महावितरण कार्यालयातील केबिन आणि फर्नीचरची तोडफोड केली आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हैरान झालेले आहेत. यातच रोजगार नसल्याने जगणे अवघड झाले आहे. सतत निवेदन देऊनही शासन आणि महावितरणने दुर्लक्ष केल्याने केले हे आंदोलन केल्याच्या भावना संतप्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान पोलिसांनी  मनसेचे कळंब तालुकाध्यक्ष सागर बारकुल, शहराध्यक्ष अमोल राऊत, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर थोरात, तालुका संघटक कृष्णा गंभीरे यांना ताब्यात  घेतले आहे.

 
Top