Views


जिल्ह्यातील वाढता कोरणा प्रार्दुभाव, अशा विविध विषयावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाची पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घ्यावा -- आ. सुजितसिंह ठाकूर


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रार्दुभाव व जिल्ह्यातील विविध विषयावर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची बैठक घेऊन आढावा घ्यावा अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंहठाकूर यांनी पालक मंत्री शंकरराव गडाख यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात वाढता कोरोना प्रार्दुभाव आणि दिवसेदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या व मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे. हे वाढते प्रमाण जिल्हा वासियांसाठी चिंतेची ठरत असून लोकांत भीतीचे वातावरण आहे. कोरोना संकटाच्या या गंभीर परिस्थितीत पहिला लाक डाऊन सुरू झाल्यापासून आजतागायत एकदाही लोकप्रतिनिधी समवेत प्रशासनाची घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपायोजना संदर्भात विचारविनिमय ची बैठक झालेली नाही. लोकप्रतिनिधी स्वतःहून सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेऊन कार्यरत आहेत. मात्र प्रशासनाच्या लोकप्रतिनिधी समवेत समन्वयाचा अभाव असून लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. यामुळे प्रशासनावर नियंत्रण कोणाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कोरूना प्रादुर्भावाची स्थिती दिवसेंदिवस वाढतच असून जिल्ह्यात कोरणा बाधित रुग्णांची संख्या 498 झाली असून 17 जणांचे मृत्यू झाले आहेत. परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाशी मुकाबला व उपाय योजना यावर विचार विनिमय तसेच शासनाने आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत कोविंड -- 19 साठी खर्चास मान्यता दिलेला निधी खर्च शेतकऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले प्रश्न, निधी उपलब्धता व खर्च आणि जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या व गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधींची आपल्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.
 
Top