Views


*काश्मिर घाटी मध्ये घडलेल्या हिंदूंच्या नृशंस हत्येचा निषेध करीत जिहादींंचा कायमचा बंदोबस्त करावा, लोहारा बजरंग दलाची मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


काश्मिर घाटी मध्ये घडलेल्या हिंदूंच्या नृशंस हत्येचा निषेध करीत जिहादींंचा कायमचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी लोहारा बजरंग दलाच्या वतीने मा.महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ११ आक्टोंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात काश्मीर घाटीत गेल्या आठवडाभरात भारतीयांच्या केल्या गेलेल्या हत्या व नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या यावर तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत आहोत. जिहादी आतंकवादाचा पूर्णतया विनाश करण्याकरिता पाकिस्तानला न भूतो न भविष्यती असे उत्तर द्यावे. तसेच हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित करावी. हिंदूंच्या काश्मीर घाटीतील पुनर्स्थापनेशिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे. हिंदूंच्या सातत्याने निवडून होणाऱ्या नृशंस हत्यांमुळे आहत झालेले बजरंग दलाचे कार्यकर्ते आज दिनांक११ आँक्टोबर २०२१ रोजी देशभरात जिहादी आतंकवादाविरुद्ध तीव्र प्रदर्शन करीत आहेत. 
भारताच्या पावन भूमीला रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश कृत संकल्प आहे. जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे आम्ही योग्य पद्धतीने जाणतो.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे. आतंकवादाचा राजनैतीक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या जिहादी पाकिस्तान वर अंकुश लावण्याकरिता विश्व समुदायाने पुढे यावे अशी मागणी व आवाहन आम्ही करीत आहोत. बलीदानी हिंदू व शिख यांच्या परिवारासोबत आम्ही मनःपूर्वक संवेदना प्रगट करत असतांनाच विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता व संपूर्ण हिंदू समाज पिडीत परिवारांसोबत उभा आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारत विषारी सापांची, नागांची फणी ठेचण्याची परंपरा विसरलेला नाही. त्यांचा बदोबस्त करणे आम्हाला माहिती आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रखंड मंत्री दत्तात्रय सलगरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी, प्रखंड सहमंत्री शैलेश नकाशे, प्रखंड संयोजक महादेव भुसाप्पा, जिल्हा सहमंत्री दत्तात्रय दंडगुले, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, बालाजी चव्हाण, युवराज जाधव, शिवाजी पवार, गणेश कोळी, बस्वराज कोंडे, मातृशक्ती कस्तृरबाई चव्हाण, अभिशेक मच्छिंद्र कांबळे, आदि, उपस्थित होते.
 
Top